*वेळेवर जेवण न केल्याचे दुष्परिणाम*
खुप काम आहे,असे म्हणत अनेकजण जेवण टाळतात. परंतु आरोग्यासाठी हे अतिशय घातक ठरू शकते.यामुळे शरीरात अनेक प्रकारचे आजार निर्माण होऊ शकता तसेच कार्यक्षमतेवर देखील वाईट परिणाम होऊ शकतो काही व्यक्ती वजन कमी करण्यासाठी जेवण टाळतात पण आरोग्यासाठी हे घातक आहे.
*हे आहेत दुष्परिणाम*
*वजन वाढते* वेळेत जेवण न केल्याने चयापचय प्रक्रिया बिघडते.यामुळे फॅट्स शरीरात जमा होऊन वजन वाढण्यास सुरुवात होते.
*चक्कर येणे* भुकेले राहिल्याने अशक्तपणा येऊन अनेकदा भोवळ येते.
*तणाव* भुकेल्या अवस्थेत शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोन्समध्ये वाढ होते.यामुळे तणाव जाणवतो.
*अन्य आजार* वजन कमी करायचे असल्यास पौष्टिक खा आणि काही वेळाच्या सम- प्रमाणात अंतराने खात राहा. अन्यथा अनेक आजार शरीरात शिरकाव करू शकतात.
*लठ्ठपणावर नियंत्रण* योग्य आहार आणि व्यायाम वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर योग्य पौष्टिक आहार घ्या आणि व्यायाम करा.
*मेंदूचे कार्य* ग्लुकोजच्या मदतीने मेंदूचे कार्य सुरू असते. यासाठी योग्य प्रमाणात आणि वेळेत जेवण करा.अन्यथा रक्तातील साखरेची पातळी खालावते.लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता कमी होते.
*चिडचिड* भुकेमुळे जास्त चिडचिड होते.रक्तातील साखरेची पातळी खालावल्याने मेंदूप्रमाणे मूडवर याचा परिणाम होतो.